| |
| ब्रिटिशांच्या अमलाखाली १५० वर्षे पारतंत्र्यात काढल्यावर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला * भारताचे ध्येयवाक्य- सत्यमेव जयते. * भारताचे राष्ट्रगीत- जन-गण-मन, रचनाकार- रवींद्रनाथ टागोर, प्रथम गायन कलकता अधिवेशन (२७ डिसेंबर १९११) राष्ट्रगीत म्हणून मान्यता २४ जानेवारी १९५०. * भारताचे राष्ट्रीय गीत- वंदे मातरम, रचनाकार- बंकीमचंद्र चॅटर्जी, (आनंदमठ या कादंबरीतून) |
| भारताचा राष्ट्रध्वज- मादाम कामा यांनी तयार केला. मान्यता २२ जुलै १९४७ रोजी. राष्ट्रध्वजावर सर्वात वरची पट्टी केशरी रंगाची (साहस व त्यागाचे सूचक) मधली पट्टी पांढऱ्या रंगाची (सत्य व शांतीचा सूचक) खालची पट्टी गडद हिरवा रंग (पराक्रम व विश्वासाचे सूचक) * राष्ट्रध्वजाच्या मधल्या पांढऱ्या पट्टीवर निळसर रंगाचे अशोकचक्र. हे चक्र सारनाथ येथील सिंह स्तंभावरील धर्मचक्रासारखे आहे. अशोकचक्रात २४ आरे आहेत. * भारताचा राष्ट्रीय पक्षी- मोर. (१९६४ साली मान्यता) * भारताचा राष्ट्रीय प्राणी- वाघ. * भारताचे राष्ट्रीय फूल- कमळ * फळ- आंबा. * भारताचे एकूण क्षेत्रफळ - ३२,८७,२६३ चौ.कि.मी. उत्तर दक्षिण लांबी ३,२१४ कि.मी. पूर्व-पश्चिम लांबी २,९३३ कि.मी. भारताची किनारपट्टी ६१०० कि.मी. |
| * भारताची जमीन सरहद्दीची लांबी : १५,२०० कि.मी. * भारत-चीन दरम्यान मॅकमोहन रेषा * भारत-अफगाणिस्तानदरम्यान डय़ूरँड रेषा * भारताच्या पूर्वेकडे बांगलादेश व म्यानमार तसेच बंगालचा उपसागर * भारताच्या पश्चिमेकडे अरबी समुद्र * भारताच्या उत्तरेला चीन व नेपाळ तसेच हिमाचल पर्वत * भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर * भारताच्या वायव्येला अफगाणिस्तान आणि पाकिस्तान |
| भारतातील सर्वात मोठे : * सरोवर- वुलर सरोवर (काश्मीर) * सर्वात मोठा जिल्हा- लडाख (जम्मू- काश्मीर) * सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान) * सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)- राजस्थान * लोकसंख्या- उत्तर प्रदेश * सर्वात मोठे धरण- भाक्रा (७४० फूट) * सर्वात मोठा धबधबा- गिरसप्पा (कर्नाटक) * सर्वात मोठे वाळवंट- थर (राजस्थान) * सर्वात मोठा प्लॅटफॉर्म- खरगपूर (प. बंगाल) * सर्वात मोठे क्रीडांगण- प्रगती मैदान (दिल्ली) * सर्वात मोठी मस्जिद- जामा मशीद * सर्वाधिक वनक्षेत्रे असलेले राज्य- मध्य प्रदेश * सर्वात उंच दरवाजा- बुलंद दरवाजा * सर्वात मोठे गुरुद्वारा- सुवर्ण मंदिर (अमृतसर) * सर्वात जास्त पाऊस- मावसिनराम (मेघालय) |
| भारतातील सर्वात लांब : * लेणी- अजिंठा (महाराष्ट्र) * रेल्वे पूल- सोन नदीवरील पूल पटणा * सागरी सेतू- मुंबई (वरळी ते बांद्रा) * लांब धरण- हिराकुड (ओरिसा) * रेल्वे मार्ग- जम्मू तावी ते कन्याकुमारी (हिमसागर एक्स्प्रेस) |
| सर्वात उंच : * शिखर- कांचनगंगा * पुतळा- बुद्ध पुतळा, हुसेनसागर (हैदराबाद) * मिनार- कुतूबमिनार (दिल्ली) २९० फूट * वृक्ष- देवदार |
| भारतातील सर्वात लहान/कमी : * सर्वात लहान राज्य- गोवा (क्षेत्रफळ) * सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य- सिक्कीम * सर्वात कमी लोकसंख्येची घनता - अरुणाचल प्रदेश. |
| भारतातील सर्वप्रथम घटना : * पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३) * पहिले तारायंत्र- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३) * पहिले पोस्टाचे तिकीट १ ऑक्टोबर १८५४ * पहिली सूत गिरणी- मुंबई (१८५४) * पहिले स्वातंत्र्य युद्ध- इ.स. १८५७ * पहिले जलविद्युत यंत्र- दार्जिलिंग (१८९७-९८) * पहिले आकाशवाणी केंद्र- मुंबई (१९२७) * पहिला बोलपट- आलमआरा (१९३१) * पहिली पंचवार्षिक योजना- १९५१ * पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२ * पहिली परमाणु चाचणी- पोखरण, राजस्थान * पहिले क्षेपणास्त्र- (पृथ्वी १९८८) * पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५) * भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई (१९५६) * पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१) * पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७) |
| भारतातील पहिले : * भारताचा पहिला गव्हर्नर जनरल- वॉरन हेस्टिंग्ज * पहिला व्हाइसरॉय- लॉर्ड कॅनिंग स्वतंत्र भारताचे * पहिले गव्हर्नर जनरल- लॉर्ड माऊंट बॅटन * राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष- व्योमेशचंद्र बॅनर्जी * पहिले राष्ट्रपती- डॉ. राजेंद्र प्रसाद * पहिले पंतप्रधान- पं. जवाहरलाल नेहरू * पहिले कायदामंत्री- डॉ. बाबासाहेब आंबेडकर * पहिले वर्तमानपत्र- दि बेंगॉल गॅजेट (२१ जानेवारी १७८१) * स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख- फिल्ड मार्शल करिअप्पा * पहिला भारतीय आयसीएस अधिकारी- सत्येंद्रनाथ टागोर * भारताचे पहिले फिल्ड मार्शल- जनरल माणेकशा (१९७२) * इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय- राजा राममोहन राय |
| भारतातील सर्वात पहिली महिला : * प्रथम महिला राष्ट्रपती- प्रतिभा पाटील * महिला राज्यपाल- सरोजिनी नायडू * महिला मुख्यमंत्री- सुचेता कृपलानी (उत्तर प्रदेश) * पंतप्रधान- इंदिरा गांधी * महिला राजदूत- विजयालक्ष्मी * पंडित मुंबईची पहिली महिला महापौर- सुलोचना मोदी * पहिली महिला एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी- बचेंद्री पाल * दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती- रझिया सुलतान * भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला- आरती शहा * युनोच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष- विजयालक्ष्मी पंडित * उच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश- फातिमा बीबी * भारतातील पहिली महिला चित्र पत्र अभिनेत्री- देविका राणी * पहिली महिला आयपीएस- किरण बेदी (१९७२) * पहिली वैमानिक- सौदामिनी देशमुख. |
|
|
|
| Bitmap |
|
| * भारत जगातील सर्वात जास्त भाषा बोलणारा देश. |
| * भारत मोठय़ा संख्येत मतदार असणारा लोकशाही देश. |
| * भारत जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश. |
| * भारतात जगात सर्वाधिक पाऊस पडतो. |
| * श्रीलंकेत वर्षभर पाऊस पडतो. |
| * नेपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र आहे. |
| * जगात ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. |
| * येशू ख्रिस्ताची जन्मभूमी बेथलहेम पॅलेस्टाईन देशात आहे. |
| * जेरुसलेम हे पवित्र शहर म्हणून प्रसिद्ध आहे. |
| * अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला. |
| * फिनलंड जगातील सर्वात जास्त सरोवरे असलेला देश. |
| * व्हॅटीकन सिटी सर्वात कमी प्रादेशिक क्षेत्र असलेले राष्ट्र. |
| * बर्मुडा ट्रँगल हे उत्तर अलटान्टिक महासागरातील भौगोलिक ठिकाण. |
| * इंग्लंडमध्ये जगातील पहिला तुरुंग (जेल) स्थापन केला. |
| * लंडनमध्ये सर्वात पहिली भुयारी रेल्वे सुरू. |
| * नॉर्वे हा जगातील सर्वाधिक कर असलेला देश. |
| * चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश. |
| * स्वित्र्झलड हा जगातील सर्वात कमी बेकारी असणारा देश. |
| * केनिया हा जगातील सर्वाधिक जन्मदर असलेला देश. |
| * जपान भारताकडून लोह खनिज आयात करतो. |
| * रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे जगात सर्वाधिक लांबीची समजली जाते. |
| * नॉर्वे देशाला मध्यरात्रीचा सूर्य दिसतो. |
| * चीनमध्ये उन्हाळ्यात होणाऱ्या प्रचंड वादळांना टायफून म्हणतात. |
| * स्वीडन हा जगातील सर्वात जुने वृत्तपत्र अस्तित्वात असलेला देश. |
| * दमास्कस जगातील सर्वात प्राचीन शहर. |
| * टोकियो जगातील सर्वाधिक महागडे शहर. |
| * नेदरलँडमध्ये जगातील सर्वात जुना वायदेबाजार आहे. |
| * तुर्की देशाचे चलन सर्वप्रथम सुरू झालेला देश. |
| * हिरोशिमा शहरावर जगातील पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला. |
| * अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊस या नावाने ओळखतात. |
| * अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मेडल ऑफ फ्रीडम आहे. |
| * लंडनला लोकशाही संसदीय पद्धतीचा जनक म्हणतात. |
| * दक्षिण अमेरिकेतील निकाराग्वाने पूर्ण साक्षरतेचा टप्पा गाठला. |
| * मेक्सिकोमध्ये स्वाईन फ्ल्यूचा पहिला रुग्ण आढळला. |
| * दुबईतील बुर्ज दुबई या इमारतीला जगातील सर्वात उंच इमारतीचा किताब मिळाला. |
| * फिलिपाईन्सची मारिया कॉरिझॉन अकिनो ही आशियातील पहिली महिला राष्ट्राध्यक्ष आहे. नुकतेच कर्करोगाने निधन) |
| * बिजिंग (चीन) येथे जगातील सर्वात मोठे मत्स्यालय आहे. |
| * शिकागो येथे जगातील सर्वात मोठा कत्तलखाना आहे. |
| * फिलिपाईन्स देशाकडून रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात येतो. |
| * ल्हासा (तिबेट) जगातील सर्वात जास्त उंचीवरील विमानतळ. येथे बुद्धधर्मियांचे पवित्र र्थक्षेत्र. दलाई लामांचा प्रसिद्ध राजवाडा येथे आहे. |
| * बंकिंगहॅम पॅलेस इंग्लंडच्या राणीचे राहण्याचे ठिकाण. |
| * मक्का (सौदी अरेबिया) मुस्लीम धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र, मक्केच्या यात्रेवरून परत लेल्यांना हाजी ही उपाधी दिली जाते. |
| * पॅरिस येथे इंटरपोलचे मुख्यालय आहे. |
| * लंडन पोलिसांचे केंद्र कार्यालय स्कॉटलंड यार्ड या नावाने प्रसिद्ध आहे. |
| * चीन हा लष्करी शिक्षण सक्तीचे असलेला आशियाई देश आहे. |
| * बोट्सवाना हा जगातील स्वत:चे लष्कर नसलेला देश आहे. |
| * चीन हा जगातील सर्वात लांब भिंत असलेला देश आहे. |
| * कॅनडा सर्वात लांब रस्ते. |
| * जपान हा जहाजबांधणी व्यवसायात जगातील अग्रेसर देश. |
| * चीन हा मातीच्या भांडय़ांसाठी प्रसिद्ध असलेला देश आहे. |
| * कॅनडा हा वृत्तपत्र कागद निर्मितीत जगात अग्रेसर असलेला देश आहे. |
| * ब्राझील कॉफी उत्पादनात प्रथम. |
| * भारत चहा उत्पादनात प्रथम. |
| * बांगलादेश ताग उत्पादनात प्रथम. |
| * घाना कोकोच्या उत्पादनात प्रथम. |
| * अमेरिका मका उत्पादनात प्रथम. |
| * सौदी अरेबिया क्रूड तेल उत्पादनात प्रथम. |
| * क्युबा साखर निर्यात करणारा प्रमुख देश. |
| * चिली तांबे उत्पादनात प्रथम. |
| * मॅगनीज उत्पादनात रशिया प्रथम. |
| * कोळसा उत्पादनात रशिया अग्रेसर. |
| * अमेरिका जगातील सर्वात मोठा अॅल्युमिनियम उत्पादक देश. |
| * कांगो देशात युरेनियमचे सर्वात जास्त साठे आहेत. |
| * अमेरिका अणुऊर्जा निर्मितीत प्रथम |
| * ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात मोठी हिमनदी आहे. |
| * अॅमेझॉन नदी विषुववृत्ताला दोन वेळा छेदून जाणारी नदी आहे. |
| * इटलीमध्ये जगातील सर्वात लहान नाव असलेली डी नदी आहे. |
| * चीनचे दु:खाश्रू हो-हॅग-हो नदीस म्हणतात. |
| * इंडोनेशिया जगातील ज्वालामुखींची सर्वात जास्त संख्या असलेला देश आहे. |
| * जपानमध्ये सर्वात जास्त भूकंप होतात. |
| * ग्रीनलंड जगातील सर्वात जास्त लांबीचे बेट. |
| * ब्राझीलमधील उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशाला कॅम्पोज म्हणतात. |
| * दक्षिण अमेरिकेतील वृक्षहीन गवताळ प्रदेशाला प्रेअरीज म्हणतात. |
| * इंग्लंडमधील प्रसिद्ध वृत्तपत्र द ऑब्झव्र्हर. |
| * रशियातील प्रसिद्ध वृत्तपत्र प्रवदा |
| * अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र द वॉशिंग्टन पोस्ट |
| * चीनमधील प्रसिद्ध वृत्तपत्र पीपल्स डेली |
| * भारतातील प्रसिद्ध वृत्तपत्र द इंडियन एक्स्प्रेस |
| * व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा कमिशनचे मुख्यालय आहे. |
| * ब्रुसेल्स (बेल्जियम) येथे युरोपियन एकॉनॉमी कम्युनिटीचे मुख्यालय आहे. |
| * मनिला (फिलिपाईन्स) येथे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र आहे. |
| * हेग (हॉलंड) येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. |
| * केप केनेडी (संयुक्त संस्थाने) नासाचे मुख्यालय. |
| * ऑक्सफर्ड इंग्लंडमधील सर्वात जुने विद्यापीठ. |
| * मोनॅको फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय जुगार अड्डय़ांचे केंद्र. |
| * अमेरिकेतील व्हेनिझुएला येथील एन्जल धबधबा जगातील सर्वात उंच धबधबा आहे. |
| * नेपाळ व तिबेटच्या सरहद्दीवर माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. |
| * आफ्रिकेतील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. |
| * रोम शहराला सात टेकडय़ांचे शहर म्हणतात. |
| * थायलंडला पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात. |
| * मुंबई शहराला सात बेटांचे शहर म्हणतात. |
| * जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात. |
| * शिकागो शहराला उद्यानांचे शहर म्हणतात. |
| * इजिप्तला नाईलची देणगी म्हणतात. |
| * जगप्रसिद्ध पिरॅमिड नाईल नदीच्या काठी इजिप्तमध्ये आहे. |
| * इटलीमध्ये पिसा येथे सुप्रसिद्ध झुकता मनोरा आहे. |
| * भारतातील आग्रा येथे मोगल सम्राट शहाजहान याने आपली पत्नी मुमताज हिच्या स्मृत्यर्थ जगप्रसिद्ध ताजमहाल ही वास्तू बांधली. |
|
| Bitmap
| महाराष्ट्राविषयी स्पर्धा परीक्षाभिमुख सामान्य ज्ञान |
|
|
| * महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर. |
| * महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. |
| * महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी - नागपूर. |
| * महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३५. |
| * महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे. |
| * महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे. |
| * महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे. |
| * महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात. |
| * विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे. |
| * महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते. |
| * महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे. |
| * महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे. |
| * महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात. |
| * महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे |
| * महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. |
| * महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. |
| * महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा. |
| * महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा. |
| * महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर. |
| * भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे. |
| * भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते. |
| * महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे. |
| * महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर. |
| * भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे. |
| * महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो. |
| * पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात. |
| * गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात. |
| * प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात |
| घेतले जाते. |
| * गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत. |
| * जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. |
| * औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. |
| * पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. |
| * महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात. |
| * कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात. |
| * कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात. |
| * विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात. |
| * विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो. |
| * महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे. |
| * विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे. |
| * संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे. |
| * संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे. |
| * राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे. |
| * संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे. |
| * ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे. |
| * यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे. |
| * महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे. |
| * महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक. |
| * पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे. |
| * कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे. |
| * आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला. |
| * मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात. |
| * यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात. |
| * महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे. |
| * नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे. |
| * महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे. |
| * शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे. |
| * महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो. |
| * शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे. |
| * ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली. |
| * तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे. |
| * भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे. |
| * महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे. |
| * रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात. |
| * स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर जि. नाशिक. |
| * कवी केशवसुतांचे स्मारक भालगुंड रत्नागिरी जिल्ह्यात आहे. |
| * राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे. |
| * बॉम्बे हाय तेल उत्खननासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईपासून २४० कि.मी. अंतरावर आहे. |
| * महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ जिल्ह्यात आढळतात. |
| * महाराष्ट्रातील उत्तर सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे. |
| * वाघांसाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य सातपुडा पर्वतात आहे. |
| * नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे. |
| * सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात. |
| * महाराष्ट्राचे मँचेस्टर असे इचलकरंजी शहरास म्हणतात. |
| * कालिदासाने मेघदूत काव्य रामटेक येथे लिहिले. |
| * कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, जि. नागपूर येथे आहे. |
| * भारतातील तिसरे व महाराष्ट्रातील पहिले पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे आहे. |
| * सुप्रसिद्ध अजिंक्यतारा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. हा किल्ला शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने बांधला. |
| * डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे (रायगड) येथे आहे. |
| * फिल्म अॅड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट पुणे येथे आहे. |
| * महाराष्ट्रातील बालकामगारविरोधी मोहिमेसाठी ब्रॅड अॅम्बेसिडर म्हणून शासनाने शाहरूख खानची निवड केली. |
| * माहितीच्या अधिकाऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र हे राज्य मिलेनियर ठरले आहे, मराठवाडय़ातील औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन होणार आहे. |
| * थेट परकीय गुंतवणुकीत राज्याचा गुजरातनंतर दुसरा क्रमांक लागतो. |
| * रोजगार निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे. |
| * भारतातील परकीय गुंतवणुकीस महाराष्ट्राचा हिस्सा २४ टक्के आहे. (मार्च २००९) |
| * महाराष्ट्रावर २००२-०३ मध्ये ८२ हजार ५४९ कोटी रुपयांचे कर्ज, २००६-०७ मध्ये १ लाख ३४ हजार ४९३ कोटींवर गेले तर २००७-०८ मध्ये १ लाख ४४ हजार ३२५ कोटींच्या आसपास कर्ज होते. |
| ऐतिहासिक घटना |
|
| * १४९८, २० मे- वास्को-द-गामा या पोर्तुगीज खलाशाने केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारताकडे येण्याचा जलमार्ग शोधून काढला. सर्वप्रथम वास्को-द-गामा भारतात कालीकत येथे उतरला. कालीकतच्या झामोरीन राजाने त्याचे स्वागत केले. |
| Bitmap
| * १६००- ईस्ट इंडिया कंपनीची इंग्लंडमध्ये स्थापना. |
|
| * १६१०- मुंबई बेट इंग्रजांना पोर्तुगीजांकडून आंदण मिळाले. |
| * १६३०, १९ फेब्रुवारी- छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. |
| * १६६४- फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. |
| * १६७४, १६ जून- छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. |
| * १६८०, १३ एप्रिल- छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू. |
| * १७१३- पेशवाईचा उदय. |
| * १७५७, २३ जून- प्लासीची लढाई (बंगालचा नवाब सिराजउद्दौलाचा इंग्रजांकडून पराभव) |
| * १७५७- रॉबर्ट क्लाईव्हने भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया घातला. |
| * १७७३- रेग्युलेटिंग अॅक्ट. कोलकाता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. |
| * १७७४- वॉरन हेस्टिंग्ज भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झाला. |
| * १७७९- फ्रेंच राज्यक्रांतीस सुरुवात. |
| * १७९३- लॉर्ड कॉर्नवालिसने बंगालमध्ये कायमधारा पद्धतीची सुरुवात केली. |
| * १८१८- पेशवाईचा अस्त/ मराठी सत्तेचा शेवट. |
| * १८२८, २० ऑगस्ट- ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली. |
| * १८२९- विल्यम बेंटिकने सतीबंदी प्रथा कायदा संमत. |
| * १८४८- भारतात स्वतंत्र तार व पोस्ट खाते सुरू (लॉर्ड डलहौसी) |
| * १८५२- नाना शंकरशेठ, दादाभाई नौरोजी व भाऊ दाजी लाड यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. |
| * १८५३- मुंबई-ठाणे दरम्यान भारतातील पहिली रेल्वे सुरू. |
| * १८५४- मुंबईत पहिली स्वदेशी कापड गिरणी सुरू. |
| * १८५६- लोकमान्य बाळ गंघाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्य़ातील चिखली येथे जन्म. |
| * १८५७- भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामासाठी प्रसिद्ध काळ, संग्रामाची पहिली सुरुवात मीरत येथे झाली. मंगल पांडे या सैनिकाने काडतुसाचे कारण दाखवून प्रथमत: संग्रामास सुरुवात केली. |
| * १८५७- मुंबई, कोलकाता, चेन्नई विद्यापीठांची स्थापना. |
| * १८६१- इंडियन कॉन्सिल अॅक्ट पास. मुंबई, कोलकाता, चेन्नई येथे हायकोर्टाची स्थापना, रवींद्रनाथ टागोरांचा जन्म. |
| * १८६२- न्या. रानडे व डॉ. आर. जी. भांडारकर मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर. |
| * १८६७- प्रार्थना समाजाची स्थापना (न्या. रानडे, डॉ. भांडारकर व डॉ. आत्माराम पांडुरंग). |
| * १८६९, २ ऑक्टोबर- महात्मा गांधी यांचा पोरबंदर येथे जन्म. |
| * १८७५, ७ एप्रिल- मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना (स्वामी दयानंद सरस्वती). |
| * १८७६, २३ फेब्रुवारी- थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांचा अमरावती जिल्ह्य़ातील शेणगाव येथे जन्म. |
| * १८७७- मुंबई शेअर बाजाराची स्थापना. |
| * १८७८- व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट संमत. |
| * १८८१- लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे सुरू केली. |
| * १८८२- लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा संमत केला. |
| * १८८५, २८ डिसेंबर- मुंबई येथे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ए. ओ. ह्य़ुम यांनी केली. |
| * १८८९, १४ नोव्हेंबर- पंडित जवाहरलाल नेहरू यांचा अलाहाबाद येथे जन्म. |
| * १८९०- महात्मा फुले यांचा जन्म (पुणे). |
| * १८९१- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म (महू). |
| * १८९३- स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील जागतिक धर्म परिषद गाजविली. |
| * १८९७- रामकृष्ण मिशनची स्थापना. |
| * १९००- स्वा. सावरकरांनी नाशिक येथे मित्रमेळा संघटनेची स्थापना केली. |
| * १९०४- पहिला सहकारविषयक कायदा संमत झाला. |
| * १९०५, १६ ऑक्टो.- लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली. |
| * १९०७- सुरत येथील अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडून जहाल व मवाळ गट वेगळे. |
| * १९०८- लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य ग्रंथ लिहिला. |
| * १९११- सम्राट पंचम जॉर्जची भारतास भेट. |
| - बंगालची फाळणी रद्द झाल्याची पंचम जॉर्जची घोषणा. |
| - भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला गेली. |
| * १९१४- पहिल्या महायुद्धास सुरुवात. |
| * १९१५- महात्मा गांधी आफ्रिकेतून परत. |
| * १९१७- गांधीजींचा बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह. |
| * १९१९, १३ एप्रिल- अमृतसर येथे जालियनवाला बाग हत्याकांड. |
| * १९२०, १ ऑगस्ट- लोकमान्य टिळकांचा मृत्यू, मुंबई येथे गिरगाव चौपाटीजवळ दहन (समाधी). |
| * १९२४- सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रह केला. |
| * १९२७- भारतातील पहिले रेडिओ प्रसारण केंद्र मुंबईत सुरू. |
| * १९३०- महात्मा गांधींची मिठाचा कायदा तोडण्यासाठी साबरमती ते दांडी पदयात्रा. |
| * १९३२- महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यातील ऐतिहासिक पुणे करार. |
| * १९३५- भारत सरकारचा कायदा संमत, या कायद्यानुसार ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आला. |
| * १९३६- फैजपूर येथील काँग्रेसचे ५० वे अधिवेशन, अध्यक्ष- पंडित नेहरू. |
| * १९३९, १ सप्टेंबर- दुसऱ्या महायुद्धास सुरुवात. |
| * १९४२- मुंबई येथे गवालिया टँक येथे भारत छोडो चळवळीस सुरुवात. |
| * १९४४- नाना पाटील यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. |
| * १९४५, २४ ऑक्टोबर- संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना. |
| * १९४५- वेव्हेल योजना अपयशी ठरली. |
| * १९४५, १८ ऑगस्ट- फार्मोसा बेटावर सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघात. |
| * १९४६- कॅबिनेट मिशन (त्रिमंत्री परिषद)ची भारतास भेट. |
| - २ सप्टेंबर, जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली हंगामी राष्ट्रीय सरकारची स्थापना. |
| * १९४७, २० फेब्रुवारी- भारतास स्वातंत्र्य दिले जाईल, अशी लॉर्ड अॅटलींची घोषणा. |
| १८ जुलै- ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या विधेयकास इंग्लंडच्या राजाची मान्यता मिळून कायद्यात रूपांतर. |
| १५ ऑगस्ट, रोजी ब्रिटिशांची राजवट संपुष्टात येऊन भारताला स्वातंत्र्य मिळाले. |
| * १९४७, १६ ऑगस्ट- रॅडक्लीफ समितीनुसार भारत-पाक सीमा अस्तित्वात. |
| * १९४८, ३० जानेवारी- महात्मा गांधींचा नथुराम गोडसेकडून खून. |
| * १९४९, २६ नोव्हेंबर- भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली. |
| * १९५०, २६ जानेवारी- पहिला भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा. (क्रमश:) |
|
| Bitmap |
|
| * १९५०, २६ जानेवारी - पहिला भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा. |
| * १९५०, २३ मार्च - भारतात नियोजन आयोगाची स्थापना. |
| * १९५१, १ एप्रिल - पहिली पंचवार्षिक योजना सुरू. |
| * १९५२ - भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक पार. |
| - आंध्र प्रदेश स्थापनेचा निर्णय, राज्य निर्मितीसाठी पोडू श्रीरामुलू यांचे उपोषण व मृत्यू. |
| - डॉ. राजेंद्रप्रसाद पहिले राष्ट्रपती व पंडित नेहरू पहिले पंतप्रधान झाले. |
| * १९५३ - यूजीसीची स्थापना (सध्या अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात) |
| * १९५४ - पंचशील करार पंडित नेहरू व चौ. एन. लाय चीनचे पंतप्रधान यांच्यामध्ये. |
| * १९५५ - हिंदू कोड बिलाला मान्यता. |
| * १९५६ - भाषावार राज्य पुनर्रचना, भाषाकार भाषिक तत्त्वांवर स्थापन झालेले पहिले राज्य आंध्र प्रदेश. |
| * १९५६ - भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा तुर्भे येथील बीएआरसी केंद्रात कार्यान्वित. |
| * १९५६, ६ डिसेंबर - भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय घटनेचे शिल्पकार व दलितांचे नेते भारतरत्न |
| डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन. |
| * १९५६, २० डिसेंबर - निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे पेढी नदीच्या तीरावर निधन. |
| * १९५७ - भारतात दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुका. |
| * १९५७ - रशियाचा पहिला उपग्रह स्पुटनिक अवकाशात झेपावला. |
| * १९५९ - भारतात राजस्थानमध्ये पंचायत राजची सुरुवात, दिल्ली येथे दूरदर्शन केंद्र सुरू. |
| * १९६०, १ मे - महाराष्ट्र राज्याची निर्मिती. |
| * १९६१, १९ डिसेंबर - पोर्तुगीजांकडून गोवा मुक्त. |
| * १९६२ - भारत-चीन युद्ध, भारतात पहिल्यांदा राष्ट्रीय आणीबाणी. |
| * १९६४ - भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचे निधन. |
| * १९६५ - भारत-पाकिस्तान युद्ध. |
| * १९६६ - भारत-पाक युद्ध संपुष्टात आणणारा ताश्कंद |
| करार. अयुबखान व लाबहाद्दुर शास्त्री यांच्यामध्ये (रशियाच्या साहाय्याने). |
| * १९६६ - शिवसेना पक्षाची स्थापना, संस्थापक- श्री. बाळासाहेब ठाकरे. |
| * १९६६, २४ जानेवारी- इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान. |
| * १९६७ - महाराष्ट्रात कोयना येथे भूकंप. |
| * १९६७ - भारतात चौथ्या सार्वत्रिक निवडणुका. |
| * १९६९ - भारतात अवकाश संशोधन केंद्राची स्थापना. |
| * १९६९, १९ जुलै - इंदिरा गांधीच्या कारकीर्दीत १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण. |
| * १९७० - आसाम राज्याचे विभाजन करून मेघालय राज्याची स्थापना. |
| * १९७१ - भारत-पाक युद्धात भारताचा विजय व बांगलादेशाची निर्मिती. |
| * १९७२ - सिमला करार इंदिरा गांधी व भुट्टो यांच्यामध्ये. |
| * १९७२ - पोस्टात पीन कोड नंबरची सुरुवात. |
| * १९७४ - राजस्थानातील पोखरण येथे भारताचा पहिला अणुस्फोट (१८ मे). |
| * १९७५, १९ एप्रिल - आर्यभट्ट पहिला उपग्रह अवकाशात सोडला. |
| * १९७५, २६ जून - इंदिरा गांधींनी पहिली अंतर्गत आणीबाणी लागू केली. |
| * १९७७ - इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली व पंतप्रधान पक्षाचा राजीनामा. लोकसभेच्या नव्याने निवडणुका, जनता पक्षाची स्थापना व मोरारजी देसाई यांची चौथे पंतप्रधान म्हणून निवड. |
| * १९७८ - भारत सरकारने १०,०००, ५,००० व १,००० रुपयांच्या नोटा बंद केल्या. |
| * १९८० - जनता पक्षात पुन्हा फूट. भारतीय जनता पार्टी या स्वतंत्र पक्षाची स्थापना. |
| * १९८३ - केंद्र राज्य संबंधांसंदर्भात सरकारीया आयोगाची स्थापना. |
| * १९८४ - पहिला अंतराळवीर राकेश शर्मा अंतराळात, |
| जून- ऑपरेशन ब्ल्यू स्टार, |
| ३१ ऑक्टो. इंदिरा गांधीची निघृण हत्या. |
| * १९८५ - पंजाबच्या समस्येवर राजीव गांधी-लोंगोवाल यांच्यामध्ये पंजाब करार. |
| * १९८६ - जनरल अरुणकुमार वैद्य यांची पुण्यामध्ये हत्या. |
| * १९८७ - आर. व्यंकटरामण भारताचे नवीन राष्ट्रपती म्हणून पदग्रहण. |
| * १९९० - मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय. |
| * १९९१, २१ मे - राजीव गांधीची पेरांबुदूर येथे निघृण हत्या. |
| * १९९२ - बाबरी मशीद घटना (६ डिसेंबर). |
| * १९९३, १२ मार्च - मुंबईत एकाच वेळी १० ठिकाणी बॉम्बस्फोट, २५० हून अधिक बळी. |
| * १९९३, ३० सप्टेंबर - महाराष्ट्रातील लातूर येथे भूकंप. |
| * १९९५ - भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य. |
| * १९९६ - केंद्रात एनडीए सरकारची स्थापना, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान. |
| * १९९७ - भारताच्या स्वातंत्र्याची ५० वर्षे पूर्ण. |
| * १९९८ - डॉ. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक. ११ व १३ मे रोजी राजस्थानातील पोखरण येथे अणुबॉम्ब व हायड्रोजन बॉम्बची चाचणी. |
| * १९९९ - फेब्रुवारी - पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची वाघा सरहद्दीपासून लाहोपर्यंत बस यात्रा. |
| - कारगिल युद्ध. |
| * १९९९ - महाराष्ट्रात विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन. |
| * १९९९ - राष्ट्रीय सुरक्षा समितीची स्थापना (अध्यक्ष पंतप्रधान). |
| * २००० - छत्तीसगढ, उत्तरांचल व झारखंड या नवीन राज्यांची निर्मिती. |
| * २०००, ११ सप्टेंबर - वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला. |
| - १३ डिसेंबर भारतीय संसदेवर आतंकवाद्यांचा हल्ला. |
| * २००२ - गोध्रा हत्याकांड (गुजरात). |
| * २००५ - श्रीनगर, मुझफ्फराबाद बससेवेला प्रारंभ. |
| - माहिती अधिकाराचा कायदा (१२ ऑक्टोबर) |
| - सेवाकराची अंमलबजावणी (१ एप्रिल) |
| * २००६ - मुंबईत लोकलमध्ये बॉम्बस्फोट. |
| * २००७ - २५ जुलै भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची नियुक्ती. |
| * २००८ - २६ नोव्हेंबर - रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला. |